व्हॅलेंटाइन्स डेच्या निमित्ताने मीनल खेडकर यांनी ‘असंच होतं ना तुलाही’ या मिलिंद जोशी यांच्या कवितासंग्रहाबद्दल व्यक्त केलेले मनोगत... .....
‘पहाटे पहाटे मला जाग आली...’
‘येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे... ’
‘केव्हा तरी पहाटे... ’
ए, ए, ए, Hello, hellooo... काय चाललंय काय हे? आजपण हीच गाणी? गेले सात दिवस आपण हेच साजरं केलंय... आज जरा वेगळं शोध... बघ... हे ऐक ना...
पाण्याच्या प्रहरी
गाण्याच्या लहरी
पानांची चवरी
रानात गं...
येई शिरशिरी
जसा यावा हरी
वाजते बासरी
प्राणात गं...
आवडलंय तुला ना? मग मान्य कर ना... कसा चेहरा हसतोय तुझा बघ... हो, ही नवीनच आहे कविता... आता पहिल्यांदा तुलाच थेट ऐकवली... मी ही नव्हती ऐकली... म्हटलं दोघंही एकत्रच ऐकू आज... !!... एवढी घाई कसली तुला??? एवढंच ना? ठीक आहे, पण आधी, तू डोळे बंद नि हात पुढे कर... काय??? मी पण डोळे बंद नि हात पुढे करू??? काय बालिशपणा चाललाय आपला? आपली मुलं पण असं नाही करत आता... चम्मतग गं... बरंरंरं... hmmm... केले हात पुढे... OMG! OMG!! OMG!!! मिलिंद जोशी यांचा कवितासंग्रह...
‘असंच होतं ना तुलाही’ --- by मिलिंद जोशी
Happy Valentine’s Day!!
Ohhhh, Yesss...
Happy Valentine’s Day to you too.. !!!
कसं ना same पुस्तक घेऊन आलो आपण एकमेकांसाठी... अगदी एक मन आपलं...
असंच होतं ना तुलाही... खरंच... बरोबर ना... असंच होतं ना तुलाही...
इकडे बघ ना... काल माझा मित्र मला सांगत होता, की या पुस्तकातल्या पान नं. १४, २३, २५, ३६, ४४, ५८, ६३, ७७वरच्या कविता त्याला खूप भावल्या म्हणे... यात हसण्यासारखं काय... आता तू हे नको सांगू मला, की तुझ्या मैत्रिणीने तुला पान नं. १७, , २६, २७, २८, ४७ वरच्या कविता What’sApp केल्या म्हणून... आणि तिला त्या soliiiiiid real वाटल्या... वगैरे...
बाय द वे, मला सांग, आता यातल्या कोणकोणत्या कविता कुणाकुणाला What’sApp करणार तू?... नक्की कोणकोण येतंय डोळ्यासमोर... ऑ, ऑ,.. कसला विचार चाललाय नक्की? Idea..!!! कळलं मला... ८/१० कविता What’sApp करण्यापेक्षा
BOOKGANGA.COM वरून order place करून थेट friends ना पाठवलं तर... Surprise... endlesss joy... What an idea ji..
बरं आता ऐक ना... ही कविता - आधीचं’
तुझं वर्णन करायला
वापरावी लागतात
अक्षरं... मौनाची
भाषा... न बोलण्याची
आनंद... स्तब्धतेतला
हे सगळं
आता अधिकच खोल जाऊ लागलंय...
आपलं नातं असावं...
मौनाहूनही खोलातलं...
आपल्याला ‘तू’ आणि ‘मी’
असं नाव मिळण्याआधीचं...
केवढं intense लिहिलंय हे सरांनी... तर पुढची ‘पाऊस’ कविता बघ...
ढगांमधून चालताना
हिरवीगार गवताची रानं पाहताना
गवताच्या पात्यांना बिलगलेले
पावसाचे थेंब पाहताना
थंड आणि ओली हवा अनुभवताना
कुणाशी तरी पहिली भेट झाल्यासारखं
वाटत राहिलं...
ही भेट पहिली नाही असंही वाटत राहिलं
हे सगळं आपलंच असूनही
आपलं नाही असं वाटत राहिलं...
किती खरी आणि आपली वाटते ही कविता... या पुस्तकातल्या अशा बऱ्याच कविता अशा आहेत, की ज्या फक्त आपल्या आणि आपल्याच भावना व्यक्त करतात, असं वाटतंय...
‘पुढे काय,’ ‘मैत्र,’ ‘फुगा,’ ‘निनावी,’ ‘स्पर्श,’ ‘ध्यास,’ ‘हसू,’ ‘फोनकॉल’ अशा काही कविता वाचल्या, की वाटतं आपण सरांशी गप्पा मारता मारता आपल्याच भावना त्यांनी शब्दबद्ध केल्यात..
इतकंच काय, पण त्या वाचताना आपण त्या कविता गात आहोत असं वाटतं..
स्वप्न, मन, आठवणी, पाऊस, प्रेम, विरह, एकांत, दुरावा अशा विविध विषयांवर अगदी सहजपणे गातात या कविता...
आता ही ‘कुणी तरी’ कविता ऐक ना...
पावसाबद्दल तुला जे वाटतं
आणि मला जे वाटतं
यात जमीन अस्मानाचा फरक असेलही
पण त्यामुळे पाऊस खोटा ठरत नाही,
भरून यायचं ते भरून येतंच,
कोसळायचं ते कोसळतंच,
भिजायचं ते भिजतंच,
वाहून जायचं ते वाहून जातंच...
कुणी तरी...
पावसाची वाट पाहतंच...
प्रत्येक कविता ही अशी वेड लावून जाणारी आहे ना?... खरंय... पण तुला एक सांगू ?... हे पुस्तक उघडता क्षणीच जी पहिली कविता आहे ना ती खूप काही सांगून जाते... ऐक...
उघडकीस येण्याबद्दलच बोलायचं तर...
कवितेइतकी एक्सपोज करणारी
दुसरी कोणतीच
गोष्ट नसेल...
पण त्यासाठी
कविता
खरी खरी हवी
आणि वाचणाऱ्याच्या
हृदयाला
नजर हवी...
क्या बात है मिलिंद सर!!!हे फारच आवडलं...
बघितलंस ना... कविता काय, माणसं काय... ती वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठीसुद्धा हृदयाला नजर हवी...
आता काय??? यातल्या बऱ्याच कविता इथे वाचायच्या राहून गेल्यात... पण तुम्ही प्रत्येकाने जरूर वाचा... मिलिंद जोशी लिखित, ‘असंच होतं ना तुलाही’
आज Valentine’s day... या मंगलमय प्रेमदिनाच्या सर्वांना प्रेममय शुभेच्छा...!!
Happy Valentine’s Day... !!
- मीनल खेडकर, डोंबिवली